आ डॉ सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवार तर्फे हार्दिक स्वागत
संपादक : राजेंद्र आर तराले
सत्यशोधक न्यूज़ महाराष्ट्र
मो .न.9404862389
चंद्रपूर, ता. ५ जुलै २०२५ – आषाढी एकादशीच्या पवित्रपर्वा निमित्ताने तीर्थक्षेत्र वडा (जि. चंद्रपूर) येथील विठ्ठल-रुक्माई मंदिराकडे पारंपरिक पायदळ वारीचे भव्य आयोजन करण्यात आले. या वारीची सुरुवात चंद्रपूर येथील महाकाली मंदिरापासून झाली.
या पवित्र वारीचे स्वागत आदरणीय डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
वारीच्या स्वागतासाठी प्रकाश धारणे, किरण बुटले,नम्रताआचार्य ठेमसकर, उमेश आष्टनकर, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, सोहम बुटले, अमित निरंजने, प्रवीण उरकुडे आणि आ डॉ. सुधीर मुनगंटीवार मित्र परिवाराच्या असंख्य सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या वारीचे नेतृत्व संत श्री चैतन्य महाराज करीत होते. तसेच शंकर वरारकर, सरपंच किरण बांदुरकर तनुश्री बांदुरकर बाळकृष्ण झाडे, शंकर वासेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वारीदरम्यान पांडुरंग – रुक्मिणी – विठ्ठल यांच्या गजरामध्ये भक्तगण हरखून गेले. सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. जटपुरा गेट येथे रिंगण घालून घोड्याच्या तालमीत जयजयकार झाला आणि भक्तीमय वातावरणात सर्वांच्या चेहऱ्यावर विठ्ठलभक्तीची तेजस्वी झळक होती.
संपूर्ण वारीत सुधीर भाऊ मित्र परिवारातर्फे वारकऱ्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले आणि भक्तिमय, एकात्मतेने भरलेले वातावरण तयार झाले.
या भक्ती, समर्पण आणि सामाजिक एकतेच्या प्रतीक असलेल्या पवित्र पायदळ वारीचे तीर्थक्षेत्र वडा येथे प्रस्थान झाल्याने आषाढी एकादशीचे औचित्य अधिक मंगलमय झाले.


